
हनुमान जन्म कथा
हनुमान म्हणजेच ज्याला आपण मारुती बजरंग अशा विविध नावांनी जाणतो त्या राम भक्त हनुमान यांची जन्म कहाणी काही अजब अशीच आहे.चला तर मग महारुद्र बजरंग मारुती यांच्या जन्माची गोष्ट आपण पाहूया.प्रभू राम यांचा जन्म रामनवमीला झाला आणि त्यानंतर बरोबर सात दिवसांनी हनुमानाचा झाला.
प्रभू श्रीराम यांचा निष्ठावान सेवक,भक्तम्हणून हनुमान आपल्या सर्वाना परिचित आहे. हनुमानाची असीम भक्ती,अफाट शक्ती आणि असिम विनम्रता अशा अनेक गुणांसाठी ओळखले जातात. हनुमानाच्या जन्माची कथा ही श्रीरामांच्या जन्माशी निगडित आहे बरे का ? ती कशी तर हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते. अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून शंकर महादेवाची पूजा करत होती.आजही शिवभक्त महाशिवरात्रीला शंकराची उपासना करतात असो….याच दरम्यान अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या देखील आपल्याला मूल व्हावे म्हणून देवाची आराधना करत होत्या. त्यांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अपत्य प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाचा समपन प्रसाद म्हणून त्यांनी तिन्ही राण्यांना देवाकडून फळ मिळाले ते देऊ केले. राणी कैकयीच्या हाती आलेले फळ एक पक्षी घेऊन पळाला. पण उडताना तिच्या हातून ते दिव्य चमत्कारी फळ खाली पडले. हेच फळ वाऱ्याने पक्ष्याच्या चोचितून अंजनीच्या हातात पडले. आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले फळ तिने देवाच्या कृपा प्रसाद म्हणून ग्रहण केले.
सुमित्रा राणीने आपले अर्धे फळ सोबत वाटून खाले. त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येच्या तिन्ही राण्याना आणि एकडेअंजनी या सर्वांना मुले झाली. केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला तो अतिशय ईश्वरी अवतार वाटत होता. त्यांनी त्याचे नाव मारुती म्हणजे वारा किंवा वायू. वाऱ्यामुळे म्हणजेच वायू देवांमुळे त्या देवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले. त्यामुळे मारुतीला वायुपुत्र हे नाव ठेवले. शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार म्हणजे शंकराचा अवतार असल्याची ही श्रद्धा आहे.
हनुमान अत्यंत शक्तिशाली होता. एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्य बिंब पाहून मारुतीला तो सुंदर चेंडू वाटला. आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. आता या सृष्टीचे कसे होणार ?म्हणून हनुमान देवाला अडवायला देवांचा राजा इंद्र आडवा झाला.त्यासाठी इंद्राने आपले वज्र वापरावे लागले. हा वज्रप्रहार मारुतीच्या हनुवतिला लागला.आणि ती थोडी वाकडी झाली. त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमानअसेही पडले.
प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांचा जन्म हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला. त्यामुळे हनुमान जयंती चैत्र शुक्ल पोर्णिमेला साजरी करण्यात येते. चैत्र शुक्ल पोर्णिमा ही मार्च किवा एप्रिलमध्ये येत असल्याने या महिन्यात हनुमान जयंती साजरी करण्यात येते. मात्र काही भागात हनुमान जयंती कार्तिक कृष्ण चतुर्दशीलाही साजरी करण्यात येते. कार्तिक कृष्ण चतुर्दशी ही सप्टेंबर किवा ऑक्टोबर महिन्यात येते. त्यामुळे वर्षातून दोन वेळा हनुमान जयंती साजरी करण्यात येते. हनुमान जयंती विविध राज्यात विविध पद्धतीने साजरी करण्यात येते. तामिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे विविध राज्यात विविध पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात येते.