
उस हे राज्यात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. मात्र हे बागायती पीक शेतकऱ्यांसाठी अलीकडे डोकेदुखी सिद्ध झाले आहे. ऊस वेळेवर कारखान्यात जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच कारखान्याकडून वेळेवर एफ आर पी दिली जात नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी सहन करावी लागत आहे. एवढेच नाही तर ऊसतोड मजुरांकडून आणि वाहतूकदारांकडून देखील शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.
ऊसतोड मजूर आणि वाहतूकदार शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे मागत आहेत. या सर्व कारणांनी आता ऊस बागायतारांनी उसातला पर्याय पिकाची शोधाशोध सुरू केली आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील एका शेतकरी गटाने ऊसाला पर्याय पीक शोधण्याऐवजी उसापासून वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ तयार करून ऊस शेती फायदेशीर करून दाखवली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या मौजे आलेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी एकत्र येत एका शेतकरी ग्रुपची स्थापना केली. मॅजिक केन सेलिब्रिटिंग फार्मर्स ग्रुप असे या ग्रुपला नाव देण्यात आलं. या शेतकरी ग्रुप मधील प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येकी अर्धा एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे.
आजपर्यंत आपण ऊसापासून साखर, गूळ आणि काकवी तयार झालेली बघितली असेल परंतु ऊसापासून कुल्फी बनवलेली पाहिली आहे का? होय फक्त कुल्फीच नाही तर ऊसापासून कुल्फी, चटणी, स्लश, बर्फ गोळा, जाम बनवला आहे.
कुल्फी, चटणी, स्लश, बर्फ गोळा, जाम बनवला आहे. दौंड (Daund) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ग्रुपने ऊसापासून हे सगळे पदार्थ बनवले आहेत. ऊसापासून तयार केलेल्या या सगळ्या उपपदार्थांवर नागरिक चांगलेच फिदा झाले आहेत.
म्हणजेच मूल्यवर्धित पदार्थ देखील पारंपारिक न बनवता बाजारात मागणीमध्ये असलेले मूल्यवर्धित पदार्थ या ग्रुपने बनवून दाखवले आहेत. विशेष बाब अशी की या ग्रुपने तयार केलेल्या कुल्फीला बाजारात मोठी मागणी असून दहा रुपये प्रति नग याप्रमाणे स्वतः आउटलेट लावून या शेतकरी गटाच्या माध्यमातून कुल्फी विक्री होत आहे. यामुळे या गटाला यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाकाठी एक हजार रुपयाची सध्या स्थितीला कमाई होत आहे.
या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुल्फी आणि इतर मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी ऊसाचा रस फ्रोजन करुन ठेवला जातो. यानंतर मशिनरी च्या माध्यमातून कुल्फी तयार केली जाते. ऊस बाहेर ठेवला तर अर्ध्या तासात काळा पडतो परंतु ही कुल्फी 6 महिने टिकत असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला असून ही कुल्फी आरोग्यदायी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. गुल्फी तयार करण्यासाठी आवश्यक मशिनरी आयआयटी मुंबईतून मागविण्यात आले आहेत.
या शेतकरी गटाने उभारलेले आउटलेट हे अष्टविनायक रस्त्यालगत असून या रस्त्यावर कायमच वाहनांची वर्दळ असते यामुळे याचा फायदा या ग्रुपला होत आहे. सद्यस्थितीला हजार ते बाराशे गुल्फी रोजाना या ग्रुपच्या माध्यमातून विक्री होत आहे. त्यामुळे त्यांना चांगली कमाई या व्यवसायातून होत आहे.
शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील आलेगाव येथील शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल यात शंका नाही.
अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG